दही हंडी महोत्सवाद्वारे व्यवसाय व्यवस्थापनचा धडा- Business management lessons from dahi handi Festival

आपण दहीहंडीचा महोत्त्सव dahi handi Festival दरवर्षी उत्साहात साजरा करत असतो ज्या पद्धतीने भगवान श्रीकृष्णाने आपल्या सहकाऱ्यांना,मित्रांना  सोबत घेऊन दही, लोणी मिळवणे आणि ते सर्वांनी वाटून घेऊन सोबत खाणे हा उद्योग लहानपणी केला यालाच अनुसरून आपण दहीहंडीचा महोत्त्सव dahi handi Festival मोठ्या आनंदाने साजरा करत असतो . काही ठिकाणी तर सात आठ मजले पेक्षाही जास्त उंच अशी दहीहंडी उभी केली जाते. आणि ही दहीहंडी तरुण गोविंदांचे मनोरे उभे करून फोडत असतात. 

दहीहंडीच्या महोत्सवातून dahi handi Festival आपण आपल्या व्यवसायासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा शिकू शकतो या गोष्टी आपल्याला आपला व्यवसाय व्यवस्थापन करण्यामध्ये नक्की मार्गदर्शक ठेवू शकतात. 

आव्हानांमधून यश :-

व्यवसायात काहीही सहजपणे होत नाही. व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर अडचणी, अडथळे आणि आपल्या ध्येयापासून परावृत्त करणाऱ्या गोष्टी असतात. ‘दही हंडी’dahi handi Festival दरम्यान लोक खाली पाडण्यासाठी म्हणजेच त्यांची गती रोखण्यासाठी गोविंदांवर पाणी ओततात,फेकतात .असेच  व्यावसायिक जगातसुद्धा आपण अनेकदा स्पर्धा, आव्हानांना सामोरे जातो.

 ध्येय निश्चित करणे :-

dahi handi Festival दही हंडीच्या खेळात हंडी एका उंचीवर स्थित असते ज्याला गाठणे हे प्रत्येक गोविंदाचे लक्ष्य असते. त्याचप्रमाणे, एखाद्या उद्योगाचे ध्येय उद्योगात सहभागी सर्व मुख्य व्यक्तींना (पार्टनर्स, गुंतवणूकदार, कर्मचारी) चांगल्या प्रकारे परिभाषित, संप्रेषित आणि पारदर्शक असावे. उद्योजकाचे अंतिम ध्येय त्याच्या टीमच्या प्रत्येक सदस्याच्या अंतःकरणात आणि मनामध्ये अंतर्भूत असणे आवश्यक आहे जेणेकरून आपले ध्येय साध्य करण्यासाठी योग्यरित्या आश्वासक आणि वचनबद्ध असतील.

 क्षमतेपेक्षा मोठे लक्ष्य :-

हंडी जमिनीच्या पातळीपेक्षा लक्षणीय उंचीवर ठेवली असते, तिथपर्यंत पोहोचणे फार कठीण असते, परंतु असाध्य नसते . त्याचप्रमाणे, उद्योगविश्वात आपल्याजवळ उपलब्ध संसाधनांच्या कार्यक्षमतेचा प्रभावी वापर करण्यासाठी लक्ष्य नेहमी मोठे असावे. जेव्हा एखादे मोठे लक्ष्य सध्या केले जाते तेव्हा चांगली कामगिरी करणारे आणि असफल होणारे यांना विलग करता येते. उद्दिष्टे साध्य झाल्यावर कर्तृत्वाची आणि दीर्घकालीन समाधानाची भावना असते

 एक संघ-एक ध्येय (Team Work) :-

dahi handi Festival दही हंडीच्या खेळासाठी प्रचंड सांघिक प्रयत्नांची आवश्यकता असते. एखादी व्यक्ती कितीही सुपरस्टार खेळाडू असली तरीही ती एकट्याने ध्येय साध्य करू शकत नाही. संघाला सर्वोच्च स्थानावर पोहोचण्यासाठी संघाच्या सर्व सदस्यांना प्रभावी आणि कार्यक्षमतेने योगदान द्यावे लागते. संघातील मतभेद संघाचे ध्येय पूर्ण करण्याचे स्वप्न भंग करू शकते.

 योग्य ठिकाणी योग्य माणूस :-

दही हंडीमध्ये, मानवी मनोरा तयार होतो. सर्वांत खालच्या थराला मध्ये सामान्यतः मजबूत लोक असतात जे मोठा भार सहन करू शकतात. मध्यम स्तरामध्ये सहभागींकडे उच्च दर्जाची एकाग्रता आणि संतुलन कौशल्य असणे आवश्यक आहे. जो हंडी फोडण्यासाठी सर्वांत उच्च थरावर चढतो तो सहसा हलक्या वजनाचा असतो. कोणत्याही यशस्वी संस्थेमध्ये कुशल, प्रतिभावंत व्यक्तींची निवड करणे आणि त्यांना योग्य पदांवर नियुक्त करणे हे महत्त्वपूर्ण असते.

 योग्य कार्यक्षमता विकसित करा :-

दही हंडीच्या खेळात यशाचा मुख्य पैलू म्हणजे सर्व सहभागींमध्ये भार सहन करण्याची क्षमता आणि संतुलन कौशल्य. ही कौशल्ये विकसित करण्यासाठी पुरेसा सराव आवश्यक असतो. त्याचप्रमाणे, कोणत्याही औद्योगिक संस्थेच्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण आणि ज्ञान देणे याला अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे.

 आंतर-विभागीय (Inter-Departmental) समन्वय :-

सर्व सहभागींनी सुव्यवस्थित पद्धतीने काम करणे आवश्यक आहे जेणेकरून मनोरा तुटू नये. इथे परस्पर निर्भरता आणि परस्पर सहाय्य आवश्यक असते. कॉर्पोरेट संस्थेच्या आंतर-विभागीय (Inter-Departmental) समन्वयाशी तुलना करता, कर्मचाऱ्यांची आकलनशक्ती आणि एकमेकांना समजून घेण्याची कुवत हे महत्त्वपूर्ण पैलू असतात, ज्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही.

“जर तुम्हाला स्वतःला मोठे ध्येय गाठायचे असेल तर इतरांना मोठे करा”

 

Leave a Comment